Showing posts with label अग्रलेख. Show all posts
Showing posts with label अग्रलेख. Show all posts

Sunday, January 25, 2009

कला' नव्हे देशद्रोह

"कला' नव्हे देशद्रोह
कला ही कला असते. तिला धर्म, पंथ, भाषा, वर्ण कशाचेच बंधन नसते असे म्हणतात, पण ते तद्दन खोटे आहे. कोणतीही कला ही एखाद्या संस्कृतीचे प्रतीक असते. जेव्हा दोन संस्कृतींमध्येच संघर्ष उद्‌भवलेला असतो तेव्हा कलेविषयीचे विचार बासनात गुंडाळून ठेवायचे असतात. जेव्हा मैत्री, स्नेह, सौहार्दता पाझरत असते तेव्हाच कलेचे पाझरणे क्षम्य असते. सीमेवर आपले सैनिक ज्या संस्कृतीविरुद्ध लढताना धारातिर्थी पडत आहेत, देशात असंख्य निष्पाप नागरिक ज्या संस्कृतीच्या दूतांकरवी मारले जात आहेत त्या संस्कृतीतील कला आणि कलाकार यांचे गोडवे गाणे याला आता देशद्रोहच म्हटले पाहिजे. पाकिस्तान ही संस्कृती आहे. विध्वसंक आणि रानटी असे तिचे स्वरूप आहे. हिंसाचार हा रक्ताचा गुण आहे. इस्लामेतर लोक नाममात्र असताना शियांच्या मशिदीत सुन्नींकडून आणि सुन्नीच्या मशिदीत शियांकडून नमाज चालू असताना बॉबस्फोट होतात आणि नमाजी मारले जातात. कराचीच्या लाल मशिदीत सरकारलाच सैनिक पाठवून गोळीबार करावा लागला. हेच रक्ताळलेले हात आता हिंदुस्थानात वित्त आणि प्राणहानी होईल असे घातपात घडवत आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना भारतात बोलावणे हा प्रकारच अतर्क्य आहे. सेक्युलर आणि कम्युनिस्ट लेखकही सध्या थोबाड आणि लेखण्या बंद ठेवून बसले आहेत.
देशात सर्वत्र पाकिस्तानविषयीची कमालीची चीड निर्माण झाली आहे, असे असताना "सोनी' या वाहिनीने "चिंचपोकळी ते चायना' अशा निरर्थक नावाची विनोदी मालिका सुरू करायचे ठरवले आहे. अंधेरीच्या मोहन स्टुडिओत या मालिकेचे चित्रण सुरू होते. चित्रिकरणात शकील अहमद सिद्दिकी हा पाकिस्तानी विनोदवीर भाग घेत होता. राज ठाकरेंच्या मनसेचे अभय खोपकर यांना हे कळताच कार्यकर्त्यांसह ते स्टुडिओत गेले चित्रिकरण बंद पाडले आणि शकीलला चार दिवसांत मायदेशी जायला सांगितले. तुला जे काही विनोद करायचे ते पाकिस्तानात जाऊन कर असेही खोपकर यांनी बजावले. मनसे आणि खोपकर यांचे अभिनंदन त्याचबरोबर महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचेही अभिनंदन. नेहमीप्रमाणे काही चाबरट पत्रकारांनी गृहमंत्र्यांना मनसेवर कारवाई करणार का म्हणून विचारले. रा.रा. पाटील असते तर ""कायदा हातात घेणाऱ्यांची सरकार गय करणार नाही'' अशी फालतु बडबड त्यांनी केली असती, पण जयंतरावांनी ""पाकिस्तानविषयी चीड असल्याने पाकिस्तानी कलाकारांना कोणी बोलावू नये'' अशी सरकारी भूमिका स्पष्ट केली. कारवाईबद्दल विचारले असता चौकशीनंतर बघू असे मोघमात उत्तर दिले. "सोनी' या वाहिनीला भारतात पुरेसे विनोदवीर मिळाले नाहीत का? भारतीय प्रेक्षकांच्या पैशावर चाललेल्या "सेानी' वाहिनीस पाकिस्तानचे एवढे प्रेम असेल तर "सोनी' वाहिनीवर देशद्राहीपणाचा शिक्का मारून तिच्यावर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकावा. गावोगावच्या केबल ऑपरेटरनी "सोनी' चे प्रेक्षपण फुकट मिळाले तरी नाकारावे. "सोनी' प्रमाणेच एन.डी.टी.व्ही. नावाची एक वाहिनी आहे. या वाहिनीलाही आता कसला तरी झटका आला आहे. सरस्वती आणि भारतमातेची अभद्र, अश्लील चित्रे काढणारा मकबुल फिदा हुसेन हा थेरडा चित्रकार आहे आणि तो थोर चित्रकार आहे म्हणून त्याचा गौरव करण्याचे या वाहिनीने ठरवले आहे. एखाद्या वाहिनीचा वट्ट कमी होतो तेव्हा लोकांच्या तोंडी आपले नाव राहावे यासाठी काही आचरट, काही वादग्रस्त गोष्टी कराव्या लागतात. हुसेनचा गौरव ही त्यापैकीच एन.डी.टी.व्ही ची आचरट कृती आहे. अनेक गुन्हे नोंदवले गेलेला हुसेन भारतात येणार नाही. आला तर त्याला अटक होईल. त्याचा गौरव सोहळा हिंदू धर्माभिमानी उधळून लावतील. हे सर्व माहिती असूनही हुसेनचा गौरव करायला निघालेल्या एन.डी.टी.व्ही.वर बहिष्कार घालावा. आपल्याला अन्य काही जमले नाही तरी देशद्रोही आणि धर्मद्रोही वाहिन्यांना निश्चित धडा शिकवू शकतो.